Jaipur to Mumbai train golibar.
एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्याला अटक.
जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.हा गोळीबार पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाला आशी माहिती प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे. तर यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत असून त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप कळू शकले नाही.
चेतन सिंह असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये येताच पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्याचे समजते.या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही पॅसेंजर सध्या मुंबई सेंट्रल स्थानकात पोहचली आहे.
👇हे देखील वाचा👇
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश.👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



